Fact Check : दिलजीत दोसांझ ने नाही केला हा त्यांच्या नावावर व्हायरल होत असलेला ट्विट

दिलजीत दोसांझ ने ट्विट करून नाही म्हंटले कि शेतकर्यांसारखेच शिकलेले लोकं रस्त्यावर बसले असते तर आज एअरपोर्ट, रेल्वे स्टेशन विकल्या नसते गेले, ना नौकऱ्या गेल्या असत्या. हा व्हायरल पोस्ट त्यांच्या पैरोडी अकाउंट वरून केला गेला आहे.

Fact Check : दिलजीत दोसांझ ने नाही केला हा त्यांच्या नावावर व्हायरल होत असलेला ट्विट

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): शेतकरी आंदोलनाच्या समर्थानात पंजाबी गायक आणि बॉलीवूड अभिनेते दिलजीत दोसांझ बऱ्याच काळापासून सोशल मीडिया वर आपले विचार आणि मत शेअर करत आहेत. आता त्यांच्या एका ट्विट चा स्क्रीनशॉट सोशल मीडिया वर व्हायरल होत आहे, ज्यात लिहले आहे कि जर शेतकर्यांसारखेच शिकलेले लोकं रस्त्यावर आले असते तर ना एअरपोर्ट विकले गेले असते, ना रेल्वे स्टेशन, ना नौकऱ्या गेल्या असत्या ना जीडीपी पडली असती. दावा केला जात आहे कि हा ट्विट दिलजीत दोसांझ यांनी केला.
विश्वास न्यूज ला आपल्या तपासात व्हायरल ट्विट खोटा असल्याचे लक्षात आले. हा त्यांच्या कुठल्यातरी फॅन नि बनवलेला पैरोडी अकाउंट आहे ज्यावरून हा ट्विट केला गेला.

काय होत आहे व्हायरल?

फेसबुक यूजर Anoop Sandhu ने हि पोस्ट शेअर केली ज्यात लिहले आहे कि, “काश किसानों की तरह पढ़े लिखे लोग भी सड़को पर आ जाते, न एयरपोर्ट बिकता, न रेलवे स्टेशन, न LIC, BPCL बिकती, न नौकरी जाती, न बेरोजगारी बढ़ती, न जीडीपी गिरती!”
या पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन तुम्ही इथे बघू शकता.

तपास:

विश्वास न्यूज ने तपासाची सुरुवात सगळ्यात आधी, व्हायरल पोस्ट मध्ये दिसत असलेल्या ट्विटर हॅन्डल @Diljitdosanjhi याला सर्च करण्यापासून केली. त्यात आम्हाला हा ट्विटर हॅन्डल मिळाला. या ट्विटर हॅन्डल वर स्पष्ट लिहले गेले होते कि दिलजीत दोसांझ च्या नावाने बनवलेले हे एक पैरोडी अकाउंट आहे. हा अकाउंट मे २०१९ मध्ये बनवण्यात आला होता आणि याचे 465000 फॉलोअर्स आहेत, हा हॅन्डल शिवम यादव नावाच्या ट्विटर हॅन्डल सोबत कनेक्ट केले गेले आहे. हा अकाउंट डिसेंबर २०२० मध्ये बनवला गेला आहे. दिलजीत च्या या पैरोडी अकाउंट वरून बरेच खोटे ट्विट करण्यात आले आहे, तसेच त्यांच्या खऱ्या अकाउंट वरून केलेल्या बऱ्याच ट्विट ला रिट्विट देखील केले गेले आहे.

आम्हाला असे पण दिसले कि ह्या ट्विटर हॅन्डल च्या समोर ट्विटर निळ्या रंगाचा टिक मार्क नाही आहे, म्हणजेच हा वेरिफाइड ट्विटर हॅन्डल नाही आहे, तसेच दिलजीत च्या नावासमोर एक एक्सट्रा आई (i) लावला गेला आहे. दिलजीत चा खरा ट्विटर हॅन्डल त्यांच्याच नावानी आहे पण शेवटी आई लावण्यात नाही आलाय.  

या नंतर आम्ही दिलजीत चा खरा ट्विटर हॅन्डल बघितला. त्यांनी शेतकरी आंदोलनाच्या समर्थानात कोणतेच ट्विट केले नाही आणि व्हायरल ट्विट सोबत एखादा मिळत जुळत ट्विट देखील आम्हाला मिळाला नाही.

अधिक माहिती साठी आम्ही दैनिक जागरण चे बॉलीवूड कव्हर करणारे पत्रकार, स्मिता श्रीवास्तव यांना संपर्क केला. त्यांनी आम्हाला सांगितले कि व्हायरल होत असलेला ट्विट दिलजीत दोसांझ यांच्या नावाने बनलेल्या कुठल्यातरी खोट्या अकाउंट वरून केला गेला आहे. हा ट्विटर हॅन्डल दिलजीत चा वेरिफाइड हॅन्डल नाही आहे, म्हणून यावर कोणी विश्वास ठेऊ नाही असे त्यांनी सांगितले.

फेसबुक वर व्हायरल पोस्ट Anoop Sandhu नावाच्या यूजर ने केले. या यूजर ची प्रोफाइल स्कॅन केल्यानंतर आम्हाला कळले कि बातमी बनावे पर्यंत यूजर चे 4941 फ्रेंड्स होते.

निष्कर्ष: दिलजीत दोसांझ ने ट्विट करून नाही म्हंटले कि शेतकर्यांसारखेच शिकलेले लोकं रस्त्यावर बसले असते तर आज एअरपोर्ट, रेल्वे स्टेशन विकल्या नसते गेले, ना नौकऱ्या गेल्या असत्या. हा व्हायरल पोस्ट त्यांच्या पैरोडी अकाउंट वरून केला गेला आहे.

False
Symbols that define nature of fake news
Know The Truth...

Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923

Related Posts
नवीनतम पोस्ट