Fact Check: कोविड च्या टिक्याने नाही झाले ४० विद्यार्थी आजारी, व्हायरल पोस्ट खोटी आहे

व्हायरल पोस्ट खोटी आहे. २०१८ मध्ये रुबेला च्या टिक्यानंतर काही विद्यार्थ्यांना दवाखान्यात भरती केले होते. त्या घटनेची क्लिपिंग आता खोट्या दाव्यासोबत व्हायरल करण्यात येत आहे.

Fact Check: कोविड च्या टिक्याने नाही झाले ४० विद्यार्थी आजारी, व्हायरल पोस्ट खोटी आहे

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): सोशल मीडिया वर एक न्यूजपेपर क्लिप व्हायरल होत आहे, ज्यात लिहले आहे कि कानपूर मध्ये टीका लावल्यानंतर जवळपास ४० विद्यार्थ्यांना दवाखान्यात भरती करावे लागले. या पोस्ट सोबत दावा करण्यात येत आहे कि या विद्यार्थ्यांना कोरोनाव्हायरस चा टीका लावल्यानंतर दवाखान्यात भरती करावे लागले.

विश्वास न्यूज च्या तपासात हा दावा खोटा असल्याचे समजले. २०१८ साली रुबेला चा टीका दिल्यानंतर या विद्यार्थ्यांना दवाखान्यात भरती करावे लागले. त्या घटनेची क्लिपिंग आता खोट्या दाव्यासह व्हायरल होत आहे.

काय होत आहे व्हायरल?

वृत्तपत्राच्या हेडलाईन मध्ये लिहले होते, “कानपूर मध्ये टीकाकरण नंतर ४० विद्यार्थ्यांना भरती केले गेले” सोशल मीडिया वर या पोस्ट सोबत यूजर ने लिहले, “Soon after injected covid-19 vaccine in india” ज्याचा मराठी अनुवाद आहे, “भारतात कोरोनाव्हायरस च्या टीकाकरण नंतर.”

या पोस्ट चे आर्काइव्ह व्हर्जन तुम्ही इथे बघू शकता.

तपास:
भारतात दोन टिक्याना मंजुरी देण्यात आली आहे. भारत बायोटेक च्या कोवाक्सिन आणि ऑक्सफोर्ड-एस्ट्राज़ेनेका च्या कोविशिल्ड चा त्यात समावेश आहे.

जागरण च्या बातमी प्रमाणे, भारताने शनिवारी आपला टीका द्यायचा अभियान सुरु केला आणि जवळपास, 2,07,229 लोकांचे टीकाकरण केले, जी संपूर्ण विश्वात सगळ्यात अधिक संख्या आहे. अखिल भारतीय टीकाकरण अभियान च्या दुसऱ्या दिवशी जवळपास, 17,072 स्वास्थ्य कर्मचाऱ्यांना सहा राज्यात, (आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, तमिलनाडु, कर्नाटक, केरल आणि मणिपुर) मध्ये ५५३ वॅक्सीन केंद्रावर कॉरोव्हिंरुस वॅक्सीन लावली गेली.

बातम्यांप्रमाणे, टीका लावल्यानंतर ४४७ केसेस अशे समोर आले ज्यांची तब्येत खराब झाली. पण, कुठेच आम्हाला ४० विद्यार्थ्यांना दवाखान्यात भरती केल्याची अधिकृत बातमी मिळाली नाही.

आम्ही या बातमीची पुष्टी करण्यासाठी कानपुर स्थित दैनिक जागरण चे सहाय्यक वृत्तपत्र inext चे न्यूज एडिटर मयंक शुक्ला यांना संपर्क केला. त्यांनी सांगितले, “कुठल्याच मीडिया आउटलेट मध्ये अशी बातमी प्रकाशित झाली नाही आहे. हि क्लिप २ वर्ष जुनी आहे. रुबेला वॅक्सीन नंतर काही विद्यार्थ्यांमध्ये दुष्प्रभाव दिसले होते त्यानंतर त्यांना दवाखान्यात भरती केले गेले होते.

अजून तपास केल्यानंतर आम्हाला ३० नोव्हेंबर २०१८ च्या हिंदुस्थान टाइम्स मध्ये प्रकाशित एक व्हायरल लेख मिळाला. त्या बातमी प्रमाणे, कानपुर मध्ये तीन शाळांमध्ये ४० पेक्षा जास्ती विद्यार्थ्यांना खासरा आणि रुबेला च्या टिक्यानंतर ताप, डोके दुखी आणि पोट दुखी झाली होती त्यानंतर त्यांना दवाखान्यात भरती केले गेले होते.

व्हायरल पोस्ट शेअर करणाऱ्याच्या ट्विटर यूजर च्या सोशल स्कँनिंग मध्ये कळले कि यूजर पाकिस्तान चा रहिवासी आहे आणि त्याच्या प्रोफाइल ला 1,362 लोक फोल्लोव करतात. ते ऑक्टोबर २०१६ पासून सक्रिय आहे.

निष्कर्ष: व्हायरल पोस्ट खोटी आहे. २०१८ मध्ये रुबेला च्या टिक्यानंतर काही विद्यार्थ्यांना दवाखान्यात भरती केले होते. त्या घटनेची क्लिपिंग आता खोट्या दाव्यासोबत व्हायरल करण्यात येत आहे.

False
Symbols that define nature of fake news
Know The Truth...

Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923

Related Posts
नवीनतम पोस्ट