Fact Check: नक्सलवाद्यांना घेऊन राज बब्बर चे व्हायरल होत असलेले वक्तव्य तीन वर्ष जुने आहे

विश्वास न्यूज च्या तपासात स्पष्ट झाले कि राज बब्बर यांचे व्हायरल होत असलेले वक्तव्य हे २०१८ साली झालेल्या विधानसभा निवडणुकांच्या वेळचे आहे, हे आता केलेले वक्तव्य नाही. त्यांचे जुने वक्तव्य आता छत्तीसगढ च्या बिजापूर मध्ये झालेल्या नक्सलवाद्यांच्या चकमकीबरोबर जोडून व्हायरल करण्यात येत आहे.

Fact Check: नक्सलवाद्यांना घेऊन राज बब्बर चे व्हायरल होत असलेले वक्तव्य तीन वर्ष जुने आहे

नवी दिल्ली (विश्वास न्यूज): छत्तीसगढ च्या बिजापूर मध्ये ४ एप्रिल रोजी झालेल्या नक्सलवाडी हल्ल्यानंतर सोशल मीडिया वर एका वृत्तपत्राचे कात्रण व्हायरल होत आहे. हे कात्रण अभिनेता व काँग्रेस नेते राज बब्बर यांच्या छायाचित्र सोबत शीर्षक लिहले गेले आहे: “राजबब्बर बोले, क्रांति कर रहे हैं नक्सली”।
नक्सलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीमध्ये २३ सुरक्षाकर्मी शहिद झाल्यानंतर सोशल मीडिया वर न्यूजपेपर च्या कात्रण द्वारे राज बब्बर यांच्यावर निशाणा सोडण्यात येत आहे. दावा करण्यात येत आहे कि एकीकडे सुरक्षाकर्मी शहीद होत आहे तर दुसरीकडे राज बब्बर नक्सली क्रांती करत आहेत.

विश्वास न्यूज ने व्हायरल होत असलेल्या पोस्ट चा तपास केला, त्यात हा दावा खोटा असल्याचे समजले. व्हायरल होत असलेले बातमीचे कात्रण नईदुनिया वृत्तपत्राचे रायपूर एडिशन चे आहे.
राज बब्बर ने हे वक्तव्य २०१८ साली छत्तीसगढ विधानसभा निआवडणुकांच्या वेळी एका प्रेस कॉन्फरेन्स मध्ये केले. त्यानंतर त्यांच्या या वक्तव्यावर बराच वाद देखील झाला.

काय होत आहे व्हायरल?

फेसबुक यूजर छोटू पुजारी ने हे वृत्तपत्राचे कात्रण शेअर करून लिहले: छत्तीसगढ़ राज्य के बीजापुर जिले के तर्रेम क्षेत्र में 22 सुरक्षाकर्मी नक्सली मुठभेड़ में शहीद होते हैं। पर कांग्रेस के नेता राज बब्बर कह रहे हैं नक्सली क्रांति कर रहे हैं,ऐसा कहने वाले बब्बर अब किसी भी प्रकार की सुरक्षा के हकदार हैं क्या?

या पोस्ट चा आर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

तपास:

विश्वास न्यूज ने व्हायरल पोस्ट चा तपास सुरु करताना सगळ्यात आधी इंटरनेट वर कीवर्ड सर्च च्या मदतीने राज बब्बर यांचे हे वक्तव्य शोधण्यास सुरुवात केली. आम्हाला नोव्हेंबर २०१८ मध्ये प्रकाशित झालेल्या बऱ्याच बातम्या मिळाल्या. या रिपोर्ट्स प्रमाणे, २०१८ साली छत्तीसगढ मध्ये आयोजित एका प्रेस कॉन्फरेन्स मध्ये नक्सलवाद वर बोलताना ते म्हणाले: “गोलियों से मसले हल नहीं होते, उनके सवालों का जवाब देना पड़ेगा और उनको डरा कर या लालच देकर क्रांति के लिए जो लोग निकले हुए हैं उन्हें रोक नहीं सकते हैं। ना इधर की बंदूक से हल निकलेगा ना उधर की, बातचीत से हल निकलेगा।”

राज बब्बर यांचे हे वक्तव्य तुम्ही इथे ऐकू शकता.

त्यांनी हे वक्तव्य केल्यावर बरीच खळबळ देखील उडाली होती, ज्या बद्दल मीडिया मध्ये अनेक रिपोर्ट्स प्रकाशित देखील झाल्या.

अधिक माहिती साठी आम्ही छत्तीसगढ चे नई दुनिया चे ब्युरो चीफ संजीत कुमार यांना संपर्क केला. त्यांनी स्पष्ट केले कि व्हायरल कटिंग नव दुनिया वृत्तपत्राची आहे पण ती नोव्हेंबर २०१८ मध्ये प्रकाशित करण्यात आली होती. हि आताची बातमी नाही.

आम्हाला राज बब्बर च्या अधिकृत ट्विटर हॅन्डल वर ५ एप्रिल रोजी केलेला एक ट्विट देखील मिळाला, ज्यात त्यांनी म्हंटले आहे कि आंतरिक सुरक्षा चा शत्रू नक्सलवाद आहे.

आता आम्ही त्या फेसबुक पोस्ट शेअर करणाऱ्या यूजर चा तपास केला. यूजर छोटू पुजारी ची प्रोफाइल स्कॅन केल्यावर कळले त्यांचे फेसबुक वर ४५०० पेक्षा जास्ती मित्र आहेत आणि ते छत्तीसगढ चे रहिवासी आहेत.

निष्कर्ष: विश्वास न्यूज च्या तपासात स्पष्ट झाले कि राज बब्बर यांचे व्हायरल होत असलेले वक्तव्य हे २०१८ साली झालेल्या विधानसभा निवडणुकांच्या वेळचे आहे, हे आता केलेले वक्तव्य नाही. त्यांचे जुने वक्तव्य आता छत्तीसगढ च्या बिजापूर मध्ये झालेल्या नक्सलवाद्यांच्या चकमकीबरोबर जोडून व्हायरल करण्यात येत आहे.

False
Symbols that define nature of fake news
Know The Truth...

Knowing the truth is your right. If you have a doubt on any news that could impact you, society or the nation, let us know. You can share your doubts and send you news for fact verification on our mail ID contact@vishvasnews.com or whatsapp us on 9205270923

Related Posts
नवीनतम पोस्ट